माझ्या आजवरच्या वाटचालीची अनपेक्षित दखल घेऊन; तिची ओळख राज्यपातळीवर करून देऊन महाराष्ट्र टाईम्सने मला सुखद धक्का दिला. प्रत्यक्ष मुलाखत न घेता उलगडलेला हा प्रवास आणि लिखाणातले नेमकेपण यातून पत्रकाराची माझ्या-माझ्या व्यवसायाविशयीची प्रांजळ आस्था दिसून येते. आत्मियतेने तटस्थ भूमिकेतून केलेला हा सन्मान माझ्यासाठी खरया अर्थाने " हार्दिक " आहे. महाराष्ट्र टाईम्सचे मनापासून आभार
उगवतीस क्षितिजावर हसते दिसते लोभस मोठे
मावळतीला पुन्हाहि हसते पण ते खोटे खोटे
दोन ध्रुवांची विलग अंतरे सलग न वाटे कोठे
दिशा चुम्बकांच्या ऐशा अंतरात साटे लोटे
कुणास ना ठाऊक कसे हे काळिज धडधडते
क्षण एका भेटीस्तव मन अंतर्मन धडपडते
घेत भरारी गगन विहारी विहंग मन प्रतिमा कोरी
वेध दिशांचे युगे युगे जन्मो जन्मी विस्मयकारी
अशक्य कोटी असंख्य नाती गुंता अनुनय गाभारी
अन्वय शोध बिचारे अगणित चुकार भाषा व्यभिचारी
गाळिवशा रिपुकांच्या भिंती रोप पेरती अविचारी
किती करावे थोडे ते तृप्ती न कधीच महाद्वारी
द्यावे घ्यावे विसरावे परतून न यावे माघारी
निववेल कुणी इच्छा वांच्छा थांबेल कधी का ही वारी ??