Wednesday, 9 May 2012

चिरजीवीत कहाणी

सरले ते पळ,......मन भरुनी
जपले सय समरांगण मी,.... ओल्या नयनी
ओतीत मधाळ पखाली;.... मनमानी
हिंदोळा झुलवित,.... खेळ खेळतो कोणी

ही भातुकली;.. डोळ्यात आणते पाणी
कधि गतवचनांची स्मरते आणीबाणी
विखुरल्या कथा परि पंख पेरते राणी;..
शब्दात नाहते; हृदयस्वरांची; बिंबित अबलख वाणी

बहु मुळे तळाशी दुर्वा शिरी ठिकाणी
मोगरी कळ्यांची गंधित सवेस वेणी
लाटेस किनारा; किनार्‍यालगत; अगणित; व्रत लेणी
ह्या खुणा जपाच्या;.... चिरजीवीत कहाणी

............................अज्ञात

No comments:

Post a Comment