Tuesday, 10 April 2012

जोवरी

सागराच्या तळाशी किती रत्नराशी
जगाच्या नकाशाशी झुंझतो शशी
मानवाची स्थिती वादळे संगती
मरणबाजार अवघा लढे पावसाशी

जात जातीस भेदे कुणी क्षूद्र वंशी
कळे ना कसे तो तयाचाच अंशी
बिचारे विचारांचे क्षेत्र कोरडे
स्नेह जाळून आळवे ती प्रार्थना कशी

यातना ही खरी अंत तो तूच आहे
पसारा दिगंत खंत पामरास दाहे
जगावे उरावे जिणे तोषवावे
जपावे झरे जोवरी श्वास वाहे

............................अज्ञात

No comments:

Post a Comment