Friday, 22 August 2014

"जीवन लहरी"

बेभान नव्हे अवसान हवे गाभुळल्या गाभारी
जाळतील सल; ऋतुचक्र न फिरेल आपसुक  माघारी
वेदना ओढ भिववेल विखारी कधी शूळ बाजारी
जाळीत उन्हे फिरतील अंगभर व्यथा होत संभारी

अवसेचे बळ पुनवेचे तळ पेलून सजू दे वारी
मातीचे झुंबर जडेल वा विरघळेल आणि सरेल बेजारी
ओठात संयमी लाट ललाटी काठ नितळ ऐरावत अंबारी
बिलगून राजसी थाट हवा कांचेच्या दरबारी

उकलून पाहिली मेधा ……

कोषातील हळवे उलते फुलते गंधाळत संसारी
असले नसलेले मूक पणे सजवितात ऊर कपारी
आकाश न येते कधी कुणाच्या हाती अथवा दारी
आपले आपण शोधत फिरते हे जीवन असेच लहरी

……………अज्ञात






No comments:

Post a Comment